Saturday, November 10, 2007

आज अचानक.......................


"आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

---संदिप उभळ्कर

Wednesday, November 7, 2007

-----------*** भेट ***-----------------


आज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला

तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे

"शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही"

वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस

आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी

आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो

एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते

तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे

continue.........

---संदीप उभळकर

Monday, November 5, 2007

****आयुष्याची पहाट******

एक व्यक्तिचित्रण रेखण्याचा प्रयत्न.......


अंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले
उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली
मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती
दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली
तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते
याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
"होते" आणि "आहे" यामध्येच
गरुडझेप आठवत आहे

---संदीप उभळकर

Monday, October 15, 2007

****नाती****

*****नाती*****


Its not related to me but the real story....
मलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते
आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत....नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती
एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर,तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........
continue...........
sorry for not giving next part
---संदिप उभळ्कर

****गोळाबेरीज****

काहीतरी अनपेक्षीत सांगण्याचा प्रयत्न आहे इथे.....


असाच आज विचार करत बसलो
माझ्या आजवरच्या जीवनाचा
गोळाबेरीज मांडायला बसलो
माझ्याच आयुष्यातील शब्दफुलांचा
...बेरजेत सगळे माझ्या गोळेच गोळे आले
...कसेही सोडवले तरी,गणित माझे उणेच आले
...करू तरी काय मी,माझी काय चुक
...प्रत्येक गोष्टीला आज इथे एक नवा लुक
काल जे सोपे होते,तेच आज कठीण झाले
कठीण का झाले शोधता शोधता
आयुष्य माझे शून्य झाले.....
कळले जेव्हा शून्यातच धावतोय
अर्थच माझ्या जीवनाचे सारे तेव्हा अर्थहीन झाले
...उपदेशांच्या भडिमारांचा पिरयामिड रचला लोकांनी
...शपथेवर मला आणि अपेक्षांनाही जगवला लोकांनी
...पण साला पिरयामिड पत्त्यांचाच डोलारा निघाला
...माझ्याच खांद्यावर अपेक्षांचा तेव्हा छानपैकी'जनाजा'निघाला...
पण मित्रांनो,
तेव्हाही तिथे एक कुणीतरी नाचत होत
माझ्याच नावाने मनापासून साखर कुणी वाटत होतं
पालवीच्या पानांमागे चंद्र जेव्हा लपत होता
माझ्यासाठी कुणीतरी तेव्हा तीळ तीळ मरत होतं
...मग कळले तेव्हा मला,गणितात मी मध्यात होतो
...काही उण्या अंकाचीच बेरीज मी करत होतो
...मग म्हटले जाउदे साला,पेपरच कठीण आहे
...अजून बराच वेळ आहे,आपल्याला कुठे घाई आहे
आता मात्र ठरवलयं मी हसतच जगणार
मीही आता मनाने कुणासाठी साखर वाटणार
अश्यामध्येच मित्रांनो एक फायदा असतो
आपलं झाकून मनामध्येच सारया जगाला हसवण्याचा आनंद असतो....
---संदिप उभळ्कर

काही अजून........


**आठवण**

पानावरचे दवबिंदू
आजही तसेच आहेत
पाकिटावरून तुझे वाहणे
आजही तसेच आहे
उघडले त्याला आजही तरी
कातरवेळ प्रेमळ वाटते
सुकलेल्या थेंबाचे दवबिंदू
पिंपळपानात तसेच आहेत
---संदिप उभळ्कर


**सुख**

शब्द आता मित्र नाहीत
वाटेत आता काहीच नाही
तरीही मी हल्ली सुखात जगतो
काय झाले........
जरी मी क्षणाक्षणात शंभरवेळा मरतो..
--संदिप उभळ्कर

**आधार..........**
शब्दांचीच साद कानात होती,कधीकाळी
चंद्राचीच वाट डोळ्यात होती,कधीकाळी
जगबुडी तर कधीच झाली होती
पण शब्दांनीच माझी गळचेपी केली,कधीकाळी
आधार नक्की काय असतो
तेव्हा मला कळले
ह्रदयाचे ठोके जेव्हा कधी
शब्दांसाठी बंद पडले....

---संदिप उभळ्कर

***..नजर..***
थांबतील थांबतील काय म्हणतेस
मी तर सर्व जग थांबवले होते
अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा
चार डोळ्यातून बरसवले होते
त्याच वाटेवर आज मात्र
पाऊलखुणाही दिसत नाही
धार काय नि काठी काय
जिथे आज वादळाला रडायला........
माझ्या नजरेत बघवत नाही ...
---संदिप उभळ्कर

मित्रा माझेही असेच काही झाले होते
संपवण्याचे सारे मार्ग खुले झाले होते
पण,
एकच हसू असे मिळाले की
स्वःतासाठी जगण्याचे सारे मार्ग बंद केले गेले
माझ्याच जीवनाच्या द्रुष्टिकोनात तेव्हा
विरघळण्याचे सारे मार्ग खुले झाले होते.........
---संदिप उभळ्कर


Friday, October 5, 2007

आज चुकुन...........(sandeep again)

Really this poem is a true story
& this happen with some one who related to my life.
this poem is only for that personality...



आज चुकुन माझ्या वाटेवर सर्व सर्व सर्व आलेय
सोबतीला आज माझ्या आनंदाचे दूत आलेत
मीलनाचे वारे आज चहूकडे वाहू लागलेत
धुमकेतूच्या धुलिकणांना आज पावसाचे वेध लागलेत

आकाशातील सर्व तारका आज मुळी हसतच होत्या
पावसाच्या तुषारथेंबाना आज त्या चिडवित होत्या
पाने फुले आणि आसवे सारी आज खुशीतच आहेत
फक्त तुझ्या असण्याने आज रविकिरणेही मंद आहेत
रात्रीच्या ह्या अंधारातही आज लख्ख प्रकाश आहे
मला हसत ठेवण्यासाठी चंद्र रांगेत उभे आहेत
पण,
शेवटी सारे माझे प्रश्न उत्तराच्या पाया पडले
तारकांच्या हसूमधले रहस्य मला आज कळले
अजूनही त्या तारका सर्व पाहून हसतच होत्या
गालावरच्या तुषारांना पावसात मिसळीत होत्या
अंधारातील तो प्रकाश आता मात्र तिथे नव्हता
कडाडून तो विजेसारखा हात हलवित गेला होता
जाउदे म्हटलं तरी तेच परत समोर येत
एका तिच्या आठवणीने डोळ्यात मात्र रडू येतं
हिरव्यागार लाकडात आग लावून कसं होत
धगधगणारया आगीचं त्याला मुळी भयच नसतं
धुराच्या त्या लोणाने ते मात्र तडफडत असतं
मन मात्र त्याचं तेव्हा प्रत्येक क्षणी मरत असतं
प्रत्येक क्षणी मरत असतं
.............Continue......................
---संदीप उभळकर