Saturday, September 15, 2007

माझ्या चारोळ्या...काही भावना...

**त्रिवेणि**
अश्रुंमधला खारटपणा हल्ली
जास्तच वाढत चाललाय
.
.
.
.
.
वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...
---संदिप उभळ्कर


तुझ्या क्षितिजाच्या त्या
हळव्या आणि पुसट कडा
संभ्रमाच्या छायेमधील जणू
सप्तरंगी बिकट छटा
--संदिप उभळ्कर

त्या झुरण्यात पण एक मजा असते
हसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असते
प्रेम मिळो अगर न मिळो
त्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असते
--संदिप उभळ्कर

मीही आता आवरून घेतलंय
नाईलाजाने सावरून घेतलंय
रात्रीच्या त्या अगणित थेंबाना
मीही आता चांदण्यांशी थेट वावरू दिलयं
-संदिप उभळ्कर

माझी तर आता कातरवेळ आहे
सांज तर गेली पण अंधाराची वेळ आहे
तू मात्र मनात आहेस..
जसा आभाळात तोही निरंतर आहे...
-संदिप उभळ्कर

डोळेही हल्ली मला आता
तुसरयासारखे वागवतात
शब्दातून जरी तू डोकावलीस तरी
आनंदाने उशीवर रात्रभर रांगोळी काढत राहतात......
-संदिप उभळ्कर

श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
उनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात
-संदिप उभळ्कर

तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले
-संदिप उभळ्कर

प्रेम जेव्हा उमलत होतं
तेव्हाच सारं बरसत होतं
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा फसवत होतं....
---संदिप उभळ्कर

तसेच काहीसे कातरवेळचे असते
लालगोळ्याच्या निरोपाचे..
..त्याला अमुक आमंत्रण असते
दिवा पेटून कसा जळवून जातो
पहाटेच्या किरणांना याचेच मुळी वावगे असते
-संदिप उभळ्कर

No comments: